Breaking News

आमचा पूर्ण लोकशाहीवर विश्वास आहे ,आम्ही ठोकशाहीवाले लोक नाही: देवेंद्र फडणवीस

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 19, 2021 4:16 pm
|

मुंबई – भाजप जन आशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नेतृत्वात आज (19 ऑगस्ट) पासून सुरु झाली.यावेळी नारायण राणे मुंबई विमानतळावर दाखल होताच मोठी गर्दी झाली होती. राणे यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.दरम्यान , “नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते, असे म्हणत भाजपाच्या जनआशीर्वीद यात्रेवर मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता निशाणा साधला होता.यावर र फडणवीसांनी भाष्य करत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता केलेल्या टीकेवरही त्यांनी पलटवार केला.

मुख्यमंत्र्यांनी चिंता करणं योग्य आहे, मुख्यमंत्र्यांनी अशी काळजी करायलाच हवी. पण, मुख्यमंत्र्यांनी अशी चिंता करताना राष्ट्रवादीला सांगितलं पाहिजे, काँग्रेसला सांगितलं पाहिजे आणि शिवसेनेलाही सांगितलं पाहिजे. नाहीतर , आम्हाला ब्रह्मज्ञान आणि त्यांच्यासाठ कोरडे पाषाण.. असं मुख्यमंत्र्यांनी करू नये, हीच अपेक्षा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणे यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाण्याचा नैतिक अधिकार नाही, असे म्हटले होते. यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे. स्मृतीस्थळावर जाण्यास रोकने म्हणजे संकुचित बुद्धी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमच्या करता निवडणूका येतात जातात निवडणुका महत्त्वाच्या नाही जनता महत्त्वाची असे म्हटले. आम्ही जनतेला उत्तरदायी त्यामुळे जनतेच्या करता संघर्ष करायचा आणि माननीय मोदी साहेबांनी देशातल्या सर्व समावेशक मंत्रिमंडळ तयार केलाय त्या मंत्रिमंडळातले नवीन मंत्री जनतेचा आशीर्वाद घेण्याकरता आणि जनतेशी संवाद करण्याकरिता निघालो आहोत. त्यातलाच एक भाग म्हणून ही जन आशीर्वाद यात्रा आहे.

रस्त्यावर संघर्ष करणे आणि राडेबाजी करणे हे आम्ही करत नाही . आमच्यावर कोणी आलं तर आम्ही सोडती नाही. आमची संस्कृती नाही आम्ही संघर्ष करत नाही. आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन त्या ठिकाणी मते मागणार आहोत आमचा पूर्ण लोकशाहीवर विश्वास आहे आम्ही ठोकशाही वाले लोक नाही. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वात मोठा पक्ष झालो मुंबईमध्ये मागच्या वेळेस दोनच जागा कमी राहिला यावेळेस कसर भरून काढू.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 19, 2021, 4:16 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *