Breaking News

देशातील मुस्लिम नागरिकांचा सीएए-एनआरसीशी काही संबंध नाहीः मोहन भागवत

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 21, 2021 7:08 pm
|

नवी दिल्ली: मोहन भागवत यांनी गुवाहाटीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या उपस्थितीत NRC-CAA वर लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यांनी CAA-NRC वर मुस्लिमांची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले- NRC-CAA हिंदू-मुस्लिम विभाजन म्हणून मांडणे हा एक राजकीय कट आहे. .काही लोकांकडून राजकीय फायद्यासाठी याला धार्मिक रुप दिले जात असल्याचेही भागवत म्हणाले.सीएएमुळे कोणत्याही मुस्लिमांना त्रास होणार नाही. देशातील नागरिकांचा सीएए-एनआरसीशी काही संबंध नाही.सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो असे भागवत म्हणाले

दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर मोहन भागवत आहेत. आसामच्या विविध क्षेत्रात आणि अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरासारख्या इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मोहन भागवत यांनी बैठक घेतली. या बैठकीत संघटनेशी संबंधित तसेच कोरोना महामारी संदर्भात समाज कल्याण कामांचा आढावा व उपायांवर चर्चा करण्यात आल्याचे भागवत यांनी सांगितले. संघ प्रमुख म्हणाले की, 1930 पासून भारतातील मुस्लिमांची संख्या नियोजित पद्धतीने वाढवण्यात आली. ते म्हणाले होते की बंगाल, आसाम आणि सिंध यांनाही पाकिस्तान बनवण्याची योजना होती. ही योजना पूर्णपणे यशस्वी झाली नाही, परंतु फाळणीनंतर पाकिस्तानची स्थापना झाली. पण आसाम मिळाले नाही, बंगाल मिळाले नाही, कॉरिडोर मागितला, तो मिळाला नाही मग जे मिळाले त्यात समाधान मानले आणि आता आणखी कसे मिळवले जाईल याचे प्रयत्न सुरू असल्याचे भागवत म्हणाले.

भागवत म्हणाले की स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान म्हणाले होते की, अल्पसंख्यांकांची काळजी घेतली जाईल आणि आतापर्यंत हे केले गेले आहे. आपण देखील तसे करत राहू. सीएएमुळे कोणत्याही मुस्लिमांचे नुकसान होणार नाही. नागरिकत्व कायदा आणला गेला आहे जेणेकरून शेजारच्या देशांमधील त्रासलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारापासून संरक्षण मिळू शकेल. जर बहुसंख्यांकांना देखील कोणत्याही भीतीमुळे आपल्या देशात यायचे असल्यास आपण त्यांनाही मदत करू.

आरएसएस प्रमुख म्हणाले की जर त्यावेळी लोकांची संमती घेतली गेली असती तर देशाचे विभाजन झाले नसते. पण नेत्यांनी हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याचा स्वीकार.भागवत म्हणाले, जगातून शिकण्यासाठी आम्हाला धर्मनिरपेक्षता, समाजवाद किंवा लोकशाहीची गरज नाही. ते आपल्या परंपरेत आणि रक्तामध्ये आहे. आपल्या देशाने त्याची अंमलबजावणी केली आणि ती जिवंत ठेवली.

दरम्यान, भागवत यांच्या विधानावर दिग्विजय सिंह यांनीही भाष्य केले होते. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘मोहन भागवत जी, तुम्ही ही कल्पना तुमच्या शिष्यांना, प्रचारकांना, विश्व हिंदू परिषदेला आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही द्याल का? तुम्ही मोदी-शहाजींना आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही हे शिक्षण द्याल का? ‘


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 21, 2021, 7:08 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *